मराठी अभिनेत्री अलका कुबलने केलं होतं या कॅमरामनशी प्रेम, जाणून घ्या त्यांची सुंदर प्रेमकहाणी…
.
अलका कुबल या अभिनेत्रीला आज कोण ओळखत नाही ? माहेरची साडी मधून ती साऱ्या घराघरात पोहचली आहे. तिने खूप सारी कामे केलेली आहे. ९० च्या दशकाची ती मराठी मधील आघाडीची अभिनेत्री होती.
त्यात तिचे एकामागून एक सिनेमे गाजत गेले आणि प्रेक्षकांच्या मनात घर करू लागले. तेव्हा अलका सुपरस्टार अभिनेत्री बनली होती. तिचा तो निरागस सुंदर चेहरा खूप लोकप्रिय झाला होता. पण हे करत असताना तिचं एका क्यामेरामनशी प्रेम प्रकरण चाललं होतं.
त्यात पुढे त्यांनी नंतर लग्न ही केलं. पण तिने दिलेल्या एका मुलाखती नुसार त्यांचं प्रेम हे खूप वेगळं आहे. ते पहिल्यांदा कुठं भेटले ? नंतर काय झालं ? या सगळ्या गोष्टी तिने शेयर केल्या होत्या त्या आपण जाणुन घेऊयात.
कलाकरांच्या दुनयेत प्रेम नावाची गोष्ट खूपच प्रचलित पडद्याआड आणि पडद्यावर त्यांचा रोमान्स, प्रेम करण्यात जास्त रस असतो. रसिकांना ही अश्या गोष्टी खूप आवडतात. त्यात त्यांच्या नात्याचा काही भरवसा देता येत नाही.
आज आहे तर उद्या नाही. पण काही नाती असे आहेत की एकदा सुरु झाली की पुढे ती कधी थांबलीचं नाहीत. त्यात एक जोडपं होतं जे पहिल्या भेटीत एकमेकांकडे आकर्षित झालं. प्रेम करू लागलं. आणि लग्न करून सेक्टर संसारात सुद्धा रमलं. ते म्हणजेच अलका कुबल आणि समीर आठले.
समीर आठले हे कॅमेरामन होते तर अलका अभिनेत्री. एकदा समीर आठले फिल्मीस्तान स्टुडीओ गोरेगाव मध्ये शूट करत होते. ते तिथे कॅमेरा मन होते. तेव्हा त्यांचा मित्र कला दिग्दर्शक मनोहर आचरेकर आणि ते अलका कुबलच्या घरी गेले. कारण आचरेकर अलका ला बहिण मानायचे.
तेव्हा अलका घरी नव्हती पण समीर आणि मनोहर पंधरा मिनिटांत भेटून आले. घर पाहून आले. त्यावेळी समीर आठले अलका कुबल ला ओळखत नव्हते. पंधरा दिवसांनी समीर चा कॅमरा मन म्हणून एक नवीन चित्रपट सुरु झाला. त्यात अलका प्रमुख भूमिकेत होती. तिथं खरी ओळख झाली. तेव्हा समीरने घरी येऊन गेलेलो हे सगळं सांगितलं.
बघता बघता त्यांची जवळीक वाढली. सुरुवातीला ते आधी एकमेकांचे खूप चांगले मित्र बनले. त्यानंतर नकळत दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले. पुढे अनेक चित्रपट त्यांनी सोबत कामे केली. त्यामुळे जवळीक खूप वाढली. शेवटी त्यांचं प्रेम माध्यमांच्या समोर आलं.
तेव्हा समीर एक चांगला कॅमेरा कम म्हणून नावारूपास आला होता आणि अलका एकप्रसिद्ध अभिनेत्री झाली होती. त्यावेळी त्यांनी एकमताने निर्णय घेतला की आता लग्न करायचे. पुढे त्यांचं लग्न झालं आणि सुखी संसाराला सुरुवात झाली. आज दोघेही आपल्या मुलांबरोबर खूप सुखी आहेत. त्यांची खूप गोड प्रेम कहानी आहे. त्यांना त्यांच्या पुढील आयुष्याला खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.