प्रसिद्ध अभिनेत्रीनी लग्नानंतर सोडले बॉलीवूड आणि झाल्या परदेशात स्थायिक, 3 नंबरची ने तर…
बॉलिवूडमध्ये आपण अनेकदा ऐकले असेलच की लग्नानंतर बऱ्याच अभिनेत्रींचे फिल्मी करियर संपेलेले आहे. ज्यामध्ये आपण अनेक नावे घेऊ शकतो. पण अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण आणि देसी गर्ल प्रियांका चोप्रा यांनी लोकांची मानसिकता बदलली आणि सांगितले की अभिनेतांप्रमाणेच अभिनेत्रीही लग्नानंतर सुपरहिट चित्रपट देऊ शकतात. आज त्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. पण बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नानंतर स्वत: ला बॉलिवूडपासून पूर्णपणे लांब ठेवलेले आहे. त्यांचं करियर तिथेच थांबलेलं आहे. याला कारण एकच की या अभिनेत्रींनी आपल्या जीवनातल्या अत्यंत जवळच्या असणाऱ्या प्रेमापोटी आपले करिअर सोडले. तर त्या अभिनेत्री कोण हे जाणून घेऊया. सविस्तर.
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी हे सिद्ध केले आहे की प्रेमापेक्षा काही मोठे नाही आणि या अभिनेत्रींनी प्रेमासमोर त्यांच्या कारकीर्दीची चिं’ता देखील केली नाही. कारण प्रेम म्हणजे प्रेम त्यापुढे सर्व सपशेल फे’ल ठरत आहे. आपल्या जोडीदारासह सात फेरे घेतल्यानंतर बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सदैव निरोप दिला आणि परदेशात स्थायिक झाल्या. ज्यांची आज फक्त आपण आठवण काढू शकतो. नवीन चित्रपट पाहू शकत नाही; कारण त्या बनवत नाहीत. म्हणजे काम करत नाहीत. आज या लेखात आम्ही तुम्हाला त्या अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत. या यादीमध्ये कोण समाविष्ट आहे ते पाहूया. चला जाणून घेऊया.
मुमताज : स्त्री, सेहरा आणि मुझे जीने दो यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री मुमताजने बॉलिवूडमध्ये बरेच काम केलेले आहे. तिचे खूप चाहते ही कामामुळे तयार झालेले आहेत. 1974 मध्ये मुमताजने मुंबईतील एनआरआय या व्यावसायिक व्यक्ती मयूर माधवानीशी लग्न केले. लग्नानंतर ती परदेशात स्थायिक झाली. ती आपल्या पतीबरोबर लंडनमध्ये स्थायिक झाली आणि त्यानंतर ती कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात दिसली नाही. तिने आपल्या कुटुंबास आपले प्राधान्य दिले. ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
पूजा बत्रा : अभिनेत्री पूजा बत्राने आपल्या करिअरची सुरुवात 1997 मध्ये ‘विरासत’ या चित्रपटाद्वारे केली होती. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. परंतु २००२ साली पूजाने सोनू एस अहलुवालिया या ऑर्थोपेडिक सर्जनशी तिने लग्न केले आणि त्याच्याबरोबर परदेशात स्थायिक झाली. पण २०११ साली या दोघांचा घटस्फो’ट झाला. पूजा बत्राने सन 2019 मध्ये नवाब शहासोबत दुसरे लग्न केले होते जो पेशाने एक अभिनेता आहे.
मीनाक्षी शेषाद्रि : मीनाक्षी शेषाद्रीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात अगदी लहान वयातच केली होती. वयाच्या 17 व्या वर्षी तिने मिस इंडियाचे विजेतेपद जिंकले होते. पण 1995 मध्ये मीनाक्षी शेषाद्रीने इन्व्हेस्टमेंट बँकर, हरीश मैसूर यांच्याशी लग्न केले आणि बॉलिवूडला कायमचा निरोप दिला. आता ती आपल्या पती आणि मुलांसमवेत अमेरिकेत राहते आणि तिथे तिची शाळा चालवते. याशिवाय ती सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. तिथून चं तिची हाल हवा चाहत्यांना कळत असते.
प्रीती झिंटा : प्रीती झिंटा ही एक अशी अभिनेत्री आहे की बॉलिवूड मध्ये जिचे नाव प्रत्येक दिग्दर्शक-निर्मात्याच्या यादीत प्रथम क्रमांकावर असायचं. कारण तिचं सुंदर दिसणे आणि अभिनय उत्तम असणे हे कारण होते.तिच्या सौंदर्याबरोबरच तिने डिंपलने लोकांची मनेही जिंकली होती.
अनेक चित्रपट तिचे लोकप्रिय झाले होते. बॉलिवूडची अव्वल अभिनेत्री असलेल्या प्रीतीने 2016 मध्ये जेन गुडनॉफशी लग्न केले आणि ती लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाली. लग्नानंतर प्रीतीने कोणताही चित्रपट केलेला नाही. पण IPL आणि इतर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट सुरू केली.
तर अश्या अनेक अभिनेत्री आहेत. पण सध्या पुरत्या आपण एवढयाच अभिनेत्रीची माहिती घेतली आहे. तर अश्याच नवनवीन माहिती स्टार मराठी न्यूज आपल्याला देतच राहील. आपण मात्र काळजी घेऊन तोपर्यंत सुरक्षित रहा. धन्यवाद.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.