‘दीया और बाती हम’ फेम संध्याने या उद्योगपतीशी लग्न का केलं माहितेय? लग्न करण्यामागे आहे खास कारण…
आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल खऱ्या आयुष्यात आणि पडद्यावर नेमक्या काय काय गोष्टी चालू आहेत हे माहीत असणे चाहत्यांना खूप महत्वाचे वाटतं. तर सध्या अनेकांना एकच प्रश्न पडला आहे की दिया और बाती हम मधील अभिनेत्री आणि दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक यांनी लग्न का केले तर त्याचेच उत्तर आता आपण जाणून घेणार आहोत. पण तेही एकदम सविस्तर.
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटलं जातं. दोन अनोळखी लोक एकमेकांचा हात धरून एकमेकांना साथ देण्याचे वचन देतात आणि नवरा-बायकोच्या रूपात चांगल्या-वाईट काळात एकमेकांना साथ देतात, म्हणून लग्नाच्या नात्यापेक्षा अधिक मजबूत बंधन असूच शकत नाही. दरम्यान नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न – तडजोड करणं देखील आवश्यक असते.
कसं आहे की लग्न म्हटलं की मग सगळ्याच गोष्टी येतात. नातं टिकून ठेवण्याची जबाबदारी येते. तर संयम सुद्धा जन्म घेतो. याचसोबत लग्नानंतर छोट्या छोट्या गोष्टीचा बारीक विचार करावा लागतो. संयम पूर्वक. आणि इतर ही अनेक गोष्टी आहेत.
मागे झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, बहुतांश जोडप्यांचे असेही म्हणणं आहे की पती-पत्नीच्या करिअरचे मार्ग वेगळे असल्यानं ते एकमेकांना भावनिक आधार देऊ शकत नाहीत, ज्यामुळे त्यांच्यातील समस्या वाढतच जातात. दरम्यान या प्रकरणात ‘दीया और बाती हम’ मालिकेतील संध्या बींदणी म्हणजेच दीपिका सिंह (Deepika Singh goyal) स्वत:ला खूप भाग्यवान समजते. दीपिकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, एखाद्या अभिनेत्यामध्येही तिला रोहितसारखा जोडीदार मिळू शकत नाही.
दीपिकाने तिच्या मालिकेच्याच दिग्दर्शकाशी लग्न केले असेल, तरीही दोघांचेही वर्क प्रोफाइल पूर्णपणे वेगळे आहेत. दोघांनाही चांगले ठाऊक आहे की त्यांच्या करिअरमध्ये कामांच्या तासांचा काहीही ठोस हिशेबच नसतो. ज्यामुळे कित्येक गोष्टींवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो.
दीपिका आणि रोहितच्या नात्याबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते केवळ त्यांच्या कामाबद्दलच नव्हे तर कौटुंबिक जबाबदाऱ्यांबाबतही चर्चा करतात. हीच बाब ह’ल्लीच्या जोडप्यांमध्ये फार कमी प्रमाणात आढळते. बहुतांश लोक आपल्या जोडीदाराकडून कामाशी संबंधित गोष्टी लपवतात, यामुळे नातेसंबंधावर दुष्परिणाम होऊ लागतात.
दीपिका आणि रोहितच्या नात्यातील आणखी एक सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते खासगी आयुष्यातही योग्य पद्धतीने समतोल राखत आहेत. दीपिकाने मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘सलग काम करून स्वतःला थकवायचे नाहीय. मी अजूनही ब्रे’कवर आहे, जे माझ्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचे आहे’
दीपिकाच्या बोलण्यातून स्पष्ट दिसतंय की, करिअरमुळे तिला आपल्या खासगी आयुष्याकडे दुर्लक्ष करणं अजिबात पसंत नाही. म्हणूनच रोहित प्रत्येक परिस्थितीत दीपिकासोबत कायम असतो. चांगल्या-वाईट प्रत्येक क्षणात सोबत असणाराच जोडीदार सच्चा असतो.
आलं का लक्षात आपल्या की का दोघांनी लग्न केलं. ज्याच्या सोबत लग्न केलं त्याची आयुष्य भर तर आहेच पण प्रत्येक क्षणाला साथ मिळाली तर मग जगणं सोन्याहून पिवळे होऊन जातं. या दोघांना त्यांच्या पुढील भावी वाटचाली साठी स्टार मराठी कडून स्टार शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.