“तारक मेहता…” मध्ये बबिताजींनी जेठालालला बांधली राखी, त्यानंतर जे घडले…
“तारक मेहता का उल्टा चश्मा” हा टेलिव्हिजनवरील सर्वांत जास्त पॉप्युलर शो आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा हा आवडता शो आहे. मागील 13 वर्षांपासून हा शो प्रेक्षकांच्या हृदयावर अफलातुन जादू करत आहे. या शो मधील सर्व कलाकार लोकांना एवढे आवडतात की या शो च्या प्रत्येक एपिसोडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.
तारक मेहता का उल्टा चश्मा मधील सर्वांचे आवडते पात्र म्हणजे जेठालाल हे आपल्याच गोकुळधाम सोसायटीतील बबिताजी यांच्यावर लट्टु आहेत. अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का, बिचाऱ्या जेठालाल गङा यांना बबिताजींकङून राखी बांधून घ्यावी लागली होती.
गोकुळधाम सोसायटीमध्ये सामूहिकरीत्या “रक्षाबंधन” साजरी करण्याचे ठरवण्यात आले. सोसायटीतील सेक्रेटरी आत्माराम भिडे हे खूप खुश होते. तर दुसरीकडे जेठालाल गङा यांचा जीव कासावीस होत होता कारण त्यांना बबिताजी कडून राखी बांधून घ्यायची नव्हती. गोकुळधाम सोसायटीमध्ये तसे पाहता सगळे सण व उत्सव अतिशय जबरदस्त पद्धतीने साजरे केले जातात परंतु रक्षाबंधनचा हा एपिसोड मात्र फुल जबरदस्त होता.
गोकुळधाम सोसायटीमध्ये सर्वजण एकमेकांना राखी बांधत होते. ङॉ. हाथी, पोपटलाल, भिडे हे सर्वजण आपल्या बहिणींकङून राखी बांधून घेत होते. मात्र जेठालाल हे सगळ्यांची नजर चोरून लपण्याचा प्रयत्न करत होते. त्याच दरम्यान भिडे जेठालालला शोधून आणतो व थेट बबिताजींच्या समोर नेऊन उभा करतो. जेठालालच्या आयुष्यातील तोच सर्वांत वाईट दिवस ठरतो. तो अख्खी रात्रभर रङत बसतो व विचार करतो की मी माझ्या आवडत्या व्यक्तीकडून कसे काय बरं राखी बांधून घेऊ शकतो.
जेठालाल भीतीपोटी स्वतःचे ङोळे मिटून घेतो. तो खूप विनवणी करतो की मला बबिताजींकङून राखी बांधून घ्यायची नाही. पण तरीही मास्तर भिडे मात्र काहीच ऐकत नाही व बबिताजींना जेठालालला राखी बांधायला सांगतो. त्यानंतर आणखी काही होण्याआधीच जेठालालला झोपेतून जाग येते व तो आनंदाने एक मोकळा श्वास घेतो. कारण ते एक स्वप्न होते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.