25 जिल्ह्यात निर्बंध शिथिल होणार, 11 जिल्हयात निर्बंध सुरूच; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती
मुंबई: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात सुरू असलेल्या कोरोना निर्बंधा,त शिथिलता देण्याची माहिती त्यांनी दिली. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोविड टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. राजेश टोपे म्हटलंय की टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाने चर्चा करुन काही बाबींची शिफारस मुख्यमंत्र्याना केली आहे. त्यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन-तीन दिवसांत घेतील.
शिफारसी काय आहेत?
ज्या जिल्ह्यांमध्ये पॉजिटिविटी दर कमी आहे त्या जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार असून, यामध्ये 25 जिल्ह्यांचा समावेश आहे.
शिथिल केलेले नियम कसे असतील?
- दुकाने शनिवारी सुद्धा चार वाजेपर्यंत चालू राहतील, रविवारी फक्त बंद राहिल
- दुकानं, हॉटेल्स, मंदिरे, जीम्स सुरु करण्याबाबत सकारात्मक चर्चा
- लग्न समारंभाबाबतच्या निर्णयातही थोडीफार शिथिलता येईल.
- शॉप्स, हॉटेल्स, सिनेमा ५० टक्के क्षमतेने सुरु, याठिकाणी दोन डोस पूर्ण झालेले कर्मचारी असणे बंधनकारक आहे.
- हे 11 जिल्हे तिसर्या गटातच राहणार
25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार असले तरी 11 जिल्ह्यांना मात्र तिसर्या गटातच ठेवण्यात आले. यात सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, रायगड, बीड, पालघर, अहमदनगर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार नसून गरज पडली तरी अजून कडक होण्याची शक्यता आहे.