रणवीर सोबतच्या ब्रेकअप बद्दल कतरीना कैफने केला मोठा खुलासा, म्हणाली “रणबीरने…
.
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या ब्रेकअपच्या बातम्यांदरम्यान रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या ब्रेकअपच्या बातमीने सर्वांनाच चकित केले. कुणालाही अशी अपेक्षा नव्हती. अशी शक्यता वर्तवली जात होती की रणबीर आणि कतरिना लग्न करू शकतात. त्याचबरोबर कतरिना कैफने ब्रेकअपबाबत मौन तोडले आहे.
यापूर्वी रणबीर किंवा कतरिना दोघांनीही त्यांच्या ब्रेकअपचे कारण सांगितले नव्हते. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार दोघांनी आपल्या ‘जग्गा जासूस’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आणि ते वेगळे झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, आता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ कधीही एकमेकां सोबत चित्रपटात काम करताना दिसणार नाहीत.
थोड्या दिवसांपूर्वी एका मुलाखतीत कतरिनाने रणबीर सोबतच्या ब्रेकअपविषयी खुलासा केला होता. कॅटरिना म्हणाली, “मला वाटते की कोणत्याही गोष्टीचे दोन पैलू आहेत. सकारात्मक आणि नकारात्मक. आता मी माझी विचार प्रक्रिया आणि पैटर्न ओळखू शकते. मला असे वाटते की मी आता पूर्वीप्रमाणे मित्र बनवीत नाही, ज्यांच्यासोबत मी खूप घनिष्ठपणे जोडली जाईल किंवा मी त्यांच्यावर अवलंबून राहील. ही फिल्म इंडस्ट्री आहे, हे काम करण्याचे ठिकाण आहे. कधीकधी आपण एखाद्या वैयक्तिक आणि व्यावसायिक व्यक्तीशी अगदी जवळून भेटतो.”
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि दीपिका पादुकोणने रणबीर आणि कतरिनाची ओळख करून दिली होती. त्यावेळी कतरिना दीपिकाची सर्वात चांगली मैत्रीण आणि रणबीरची प्रेमिका होती. मात्र नंतर रणबीरने दीपिकाचा विश्वासघात केला आणि कॅटरिनाला डेट करण्यास सुरवात केली. यामुळे दीपिका आणि कतरिना यांच्यात बराच काळ वाद सुरू होता.
कतरिनाच्या ब्रेकअपमुळे रणबीरला 21 कोटी रुपयांचे नुकसान झाले. मीडिया रिपोर्टनुसार रणबीर-कॅटरिनाने कार्टर रोडवरील सिल्व्हर सँड अपार्टमेंटमध्ये एक पेन्टहाऊस भाड्याने घेतला होता, त्यासाठी रणबीरने सिक्युरिटी डिपोजिट म्हणून 21 कोटी रुपये जमा केले होते. लीज कालबाह्य होण्यापूर्वी त्याने पेन्टहाउस सोडल्यामुळे पैसे बुडाले. या पेंटहाऊसचे भाडे महिन्याला 15 लाख रुपये होते. दोघेही येथे सुमारे 6 महिन्यांपासून राहत होते.