याला म्हणतात खरं प्रेम! कैप्टन विक्रम बत्रा यांची प्रेयसी आजही आहे अविवाहीत, आता जगत आहे असे जीवन…
ज्याला शब्दांत मांडूच शकत नाही ते असते प्रेम. प्रेमाची व्याख्या आज प्रत्येक जण आपापल्या अनुभूती प्रमाणे करताना आपल्याला दिसतच असेल; ज्यामध्ये काहींचे अनुभव हे आपल्या समृद्धी संपन्न किंवा प्रेमावरचा विश्वास अजून दृढ करण्यात मोलाची भूमिका बजावत असतात. आज आम्ही आपल्याला प्रेमाची अशी गोष्ट सांगणार आहोत की जी वाचून आपण अभिमानाने म्हणाल, प्रेम खरच खूप मोठं असतं. प्रेमाची ताकत जगात सगळ्यात ग्रेट असते.
आता आपण म्हणाल की काहीच न सांगता एवढ्या विश्वासाने कसं काय असे म्हणू शकता ? आधी ती गोष्ट तर सांगा. होय ! तीच गोष्ट सांगायची आहे; पण जरा सविस्तर. एका वाक्यात नाही. कारण त्या गोष्टीचा आवाका खूप मोठा आहे. गोष्ट एका सैनिकाच्या पत्नीची. देशसेवेत तिचा नवरा श’हीद होतो; पण आजही ती धाडसी महिला अविवाहित पणे नवऱ्याच्या प्रेमाची साद घालणे विसरलेली नाही.
कारगिल यु’द्धात देशासाठी अमुल्य असे योगदान देणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रा यांना देश कधीच विसरू शकत नाही. कारण त्यांनी देशासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावली आहे. अभिमानस्पद कामगिरीला बरीच वर्ष झालेली आहेत. भारताने कारगिल यु’द्ध जिंकलेले आता तब्बल २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या यु’द्धात त्यावेळी अनेक वीर सैनिकांनी अमुल्य असे योगदान दिलेलं आहे; पण त्यामध्ये शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचं महत्त्वाचं योगदान होतं. ते योगदान आपण कुणीच भारतीय कोणत्याच जन्मात विसरू शकत नाही. खरच ! सर्वांत आधी त्यांच्या कार्याला सलाम…
अश्या संघर्ष शाली वीर योद्ध्याची गोष्ट चित्रपटाद्वारे तुम्हा आम्हा सर्वांच्या पर्यंत पोहचणे ही खूप मोठी गोष्ट आहे. बॉलीवूड ने नुकताच त्यांच्या आयुष्यावर आधारीत ‘शेरशाह’ हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात विक्रम बत्रा यांची प्रेमकहाणी देखील दाखवण्यात आली आहे. आणि ती प्रेमकहाणी म्हणजे आज आदर्श प्रेम कहाणी ठरत आहे. यालाच म्हणतात खरे प्रेम असे अनेक प्रेक्षक म्हणत आहेत.
ज्यांच्या बद्दल आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत त्यांचं नाव आहे डिंपल छीमा. त्या आधी विक्रम बत्रा यांच्या प्रेयसी होत्या मग आयुष्याच्या जोडीदारीण झाल्या. १९९५ मध्ये पंजाब विद्यापीठात त्यांची पहिल्यांदाच भेट झाली होती. एमए इंग्रजीच्या अभ्यासक्रमासाठी दोघांनीही प्रवेश घेतला होता. अर्थात या दोघांचंही शिक्षण पूर्ण झालं नाही. आमची भेट घडवून आणण्यासाठीचा तो सर्व नियतीचाच खेळ होता, असं डिंपल एका मुलाखती दरम्यान म्हणाल्या होत्या.
मग काय पुढे मैत्री प्रेमात बदलली आणि प्रेम लग्नात. कारण त्यांनी एक दुसऱ्यावर जीवापाड प्रेम केलेलं होतं. पुढे विक्रम हे सैन्यात गेले आणि एक दिवस भारताच्या रक्षणार्थ कारगिल यु’द्धात श’ही’द झाले; पण आजवर त्यांच्या पत्नीने त्यांना विसरलेलं नाही. त्यांनीच काय तर देशाने सुद्धा. कधीही लग्न करणार नाही ही शपथ खरी करून दाखवणाऱ्या डिंपल यांनी कॅप्टन बत्रायांच्या नावावर स्वत: च आयुष्य केलं आणि पुन्हा एकदा प्रेम कायमच अमर असतं हे सिद्ध करुन दाखवलं. अश्या दोन्ही प्रेम वीरांना कडक सलाम ! आपण प्रेमाची ताकत काय असते ते जगाला दाखवून दिलेलं आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.